मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १०८ हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतीस अर्पण केली आदरांजली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १०८ हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतीस अर्पण केली आदरांजली

मुंबई : मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत १०८ हुतात्म्यांनी बलिदान दिलं होतं. त्यांचा आज स्मृतिदिन आहे. त्यामुळे हुतात्म्यांच्या स्मृतिदिनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील हुतात्मा चौक येथे जाऊन हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतीस आदरांजली अर्पण केली.

यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसह राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, मुंबई महापौर किशोरी पेडणेकर, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, पर्यंटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे तसेच मंत्री आदिती तटकरे, मुख्य सचिव संजय कुमार, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर आदी मान्यवर उपस्थित होते.  

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी पुकारलेल्या लढ्यात प्राण गमावलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी २१ नोव्हेंबर हा दिवस हुतात्मा स्मृतिदिन म्हणून पाळला जातो. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत १०८ हुतात्म्यांनी बलिदान दिलं होतं. 

याही बातम्या वाचा : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com