E-bonds Digital System
ESakal
मुंबई
E-Stamp Paper: व्यवहारांसाठी आता ‘ई-बाँड’, व्यापार व उद्योगात कागदी पेपर बंद
E-bonds Digital System: राज्य सरकारने आयात-निर्यात व्यवसायातील पारंपरिक कागदी बाँड बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे व्यापार व उद्योग जगताला मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई : राज्य सरकारने आयात-निर्यात व्यवसायातील पारंपरिक कागदी बाँड बंद करून डिजिटल बाँड प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला. यामुळे महाराष्ट्रातील व्यापार व उद्योग जगताला मोठा दिलासा मिळाला आहे. ‘ई-बाँड’ सुरू करणारे महाराष्ट्र देशातील सोळावे राज्य असून, आयात-निर्यात व्यवहारासाठी वापरण्यात येत असलेले कागदी स्वरूपातील स्टॅम्प पेपर बंद झाले आहेत.

