

Leopard Attack Maharashtra State Disaster
ESakal
महाराष्ट्रात वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यांना आता राज्य आपत्ती घोषित करण्यात आले आहे. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी वन्यजीव हल्ल्यात बळी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरीत सामावून घेण्याची महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, मृताच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला नोकरी देताना, त्यांच्या मूळ वेतन, महागाई भत्ता आणि स्थिरीकरणाबाबतची सर्व माहिती राज्य सरकारला रीतसर सादर केली जाईल.