मानव-वन्यजीव संघर्ष वाढला! वाघ-बिबट्या हल्ले ‘राज्य आपत्ती’ घोषित; पीडितांना मिळणार सरकारी नोकरी, सरकारचा क्रांतिकारी निर्णय

Leopard Attack Maharashtra State Disaster: महाराष्ट्र सरकारने वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्याला राज्य आपत्ती घोषित केले. हिवाळी अधिवेशनात वनमंत्री गणेश नाईक यांनी मृतांच्या कुटुंबियांना सरकारी नोकऱ्या देण्याची घोषणा केली.
Leopard Attack Maharashtra State Disaster

Leopard Attack Maharashtra State Disaster

ESakal

Updated on

महाराष्ट्रात वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यांना आता राज्य आपत्ती घोषित करण्यात आले आहे. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी वन्यजीव हल्ल्यात बळी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरीत सामावून घेण्याची महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, मृताच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला नोकरी देताना, त्यांच्या मूळ वेतन, महागाई भत्ता आणि स्थिरीकरणाबाबतची सर्व माहिती राज्य सरकारला रीतसर सादर केली जाईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com