

Maharashtra Ends Captive Market Scheme, 25 Lakh Families to Lose Free Saree Benefit
sakal
मुंबई : ‘लाडकी बहीण’ योजनेतून ९२ लाख अपात्र नावे वगळण्यात आल्याची चर्चा ताजी असतानाच, राज्य सरकारने राज्यातील गरीब महिलांना आणखी एक मोठा दणका दिला आहे. अंत्योदय रेशनकार्डधारक कुटुंबांना दरवर्षी एक साडी मोफत देण्याची ‘कॅप्टिव्ह मार्केट योजना’ अखेर सरकारने गुंडाळली आहे. या संदर्भात वस्त्रोद्योग विभागाने गुरुवारी शासन निर्णय जारी केला असून, चालू आर्थिक वर्षापासून ही योजना पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे २५ लाख गरीब कुटुंबांना मिळणारी मोफत साडी आता बंद होणार आहे.