

One Nation One E-challan
ESakal
Mumbai News: मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात वाहतुकीचे नियम अधिक कडक होणार आहेत. राज्य सरकारने 'एक राष्ट्र, एक ई-चलन' प्रकल्पाच्या अंमलबजावणीला अधिकृतपणे मंजुरी दिली आहे. वाहतुकीच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे हा याचा उद्देश आहे. गृह विभागाने जारी केलेल्या सरकारी निर्णयानुसार, या प्रकल्पासाठी १९.३५ कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.