

Maharashtra farmer loan waiver scheme
ESakal
महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’बाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याच्या प्रक्रियेस काही कालावधी लागणार असला, तरी शासन आपल्या वचनाशी ठाम आहे आणि पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ लवकरच मिळेल. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढे माहिती दिली की, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतचे, २ लाख रुपयांपर्यंतचे थकीत पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.