

Mahavikas Aghadi PC
ESakal
सोमवारपासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापले आहे. याच संदर्भात रविवारी महाविकास आघाडीची पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आणि भास्कर जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि महाविकास आघाडीचे इतर नेते उपस्थित होते. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी संध्याकाळी सरकारने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला.