

पांडुरंग म्हस्के
मुंबई : राज्याच्या पोलीस दलातील अपुऱ्या मनुष्यबळामुळे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या जवानांची मदत घेण्यात येणार आहे. अनेक पदे रिक्त असल्याने या पदांची नियमित भरती होईपर्यंत सुरक्षा मंडळाचे सुमारे तीन हजार जवान पोलीस दलाला मदत करणार आहेत.