Mumbai WeatherESakal
मुंबई
Mumbai Weather: उकाड्यामुळे मुंबईकर हैराण! आता पाऊस कधी दरवाजा ठोठावणार? हवामान विभागाने वेळच सांगितली
Maharashtra Weather Update: मुंबईकरांनी आज दिवसभर दमट हवामानाचा चांगलाच तडाखा सहन केला. सकाळपासूनच वातावरणात उकाडा जाणवत होता. मात्र आता नागरिकांना दिलासा मिळणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली.
मुंबई : मुंबईकरांनी आज दिवसभर दमट हवामानाचा चांगलाच तडाखा सहन केला. सकाळपासूनच वातावरणात असह्य उकाडा जाणवत होता. दुपारी आर्द्रता ७६ टक्क्यांपर्यंत पोहोचली, संध्याकाळी ती वाढून ७९ टक्क्यांवर गेली, तर रात्रीच्या सुमारास ही आर्द्रता तब्बल ९० टक्क्यांच्या घरात पोहोचल्याची नोंद झाली.

