

Maharashtra’s Financial Stress Deepens as Per Citizen Debt Crosses ₹85,000
sakal
मुंबई : राज्याचे स्थूल उत्पन्न आणि त्या उत्पन्नाच्या तुलनेत कर्जांचा मोठा बोजा राज्यावर आणि राज्यातील प्रत्येक नागरिकावर वाढला आहे. राज्यावरील कर्जाने मोठा उच्चांक गाठला असून, ११ लाख दोन हजार ६५४ कोटींहून अधिक रुपयांचे कर्ज राज्यावर असून, दुसरीकडे प्रत्येक व्यक्तीवर कर्जाचा भार हा ८५ हजार २७८ रुपयांपर्यंत पोचला असल्याची माहिती आर्थिक पाहणी अहवाल आणि ‘समर्थन’ संस्थेने केलेल्या राज्याच्या २०२६-२७च्या अर्थसंकल्पी विश्लेषणातून समोर आली आहे.