Manoj Jarange: उद्यापासून कडक उपोषण, पाण्याचा थेंबही घेणार नाही; आरक्षण घेऊनच मुंबई सोडणार, मनोज जरांगेंचा ठाम निर्धार

Maratha Reservation : सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर येत्या शनिवार आणि रविवार महाराष्ट्रातील मराठा लोक बाहेर निघतील. मग मुंबई सोडा तर इथून दोनशे किलोमीटर माणसे पाहायला मिळतील. मी जे बोलतो ते करतोच हे सर्वांना माहिती आहे.
Manoj Jarange addressing Maratha protesters in Mumbai, announcing an indefinite hunger strike demanding reservation.
Manoj Jarange addressing Maratha protesters in Mumbai, announcing an indefinite hunger strike demanding reservation.esakal
Updated on

Summary

  1. मनोज जरांगे यांनी जाहीर केले की ते उद्यापासून पाण्याचा थेंबही न घेता कडक उपोषण सुरू करणार आहेत.

  2. मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळाले पाहिजे, तोपर्यंत मुंबई सोडणार नाहीत असा त्यांचा निर्धार आहे.

  3. समाजाच्या नावाखाली पैसे गोळा करणाऱ्यांवर त्यांनी निशाणा साधत मराठा समाजाला आंदोलनासाठी पैसे न देण्याचे आवाहन केले.

Manoj Jarange Hunger Strike : सरकार मराठ्यांच्या मागण्यांवर अमंलबजावणी करत नाहीये, त्यामुळे मी उद्यापासून पाणी पिणे देखील सोडणार आहे. असा ठाम निर्धार मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. ते म्हणाले की, मराठ्यांनी दगडफेक, गोंधळ करु नये, मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, उद्यापासून कडक उपोषण सुरु करणार असल्याचे जरांगे यांनी जाहीर केले. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com