
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांचं आझाद मैदानात गेल्या पाच दिवसांपासून उपोषण सुरूच असून वकील पुन्हा एकदा चर्चेसाठी गेले आहेत. यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले की, गेल्या २२ वर्षांपासून कायद्याच्या चौकटीर राहून, न्यायालयाचे नियम पाळून आंदोलन करतोय. दोन वर्षांपासून शांततेत आंदोलन केलं. आम्हाला न्यायादेवता न्याय देईल अशी अपेक्षा जरांगे पाटील यांनी व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल आमच्या मनात कटुता नाही, मात्र त्यांनी फक्त आमच्या मागण्या मान्य कराव्यात असंही जरांगे पाटील म्हणाले.