
मुंबई : भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरच्या खोऱ्यातील बंदीपोरा जिल्ह्यातील ‘आरागाम’ या गावात मराठीतील पुस्तकांचे गाव फुलणार आहे. मराठी भाषा विभागाच्या राज्य मराठी विकास संस्था आणि पुण्याच्या सरहद संस्थेच्या सहयोगाने हा उपक्रम राबविला जाणार आहे. महाबळेश्वरजवळील ‘भिलार’ या पुस्तकाच्या गावानंतर राज्याबाहेर पहिल्यांदा ‘पुस्तकाचे गाव’ आकाराला येणार आहे.