Mumbai : भारताच्या नंदनवनात फुलणार ‘पुस्तकाचे गाव’; ‘सरहद’च्या सहकार्याने मराठी भाषा विभागाचा पुढाकार

आता काश्मीरमध्येही मराठी पुस्तकांचे गाव फुलणार आहे. काश्मिरातील आरागाम या पुस्तकाच्या गावाचे २ मेपर्यंत उद्‍घाटन केले जाणार आहे. त्यासाठी सरहद संस्थेकडून तयारी केली जात आहे.
"Marathi Language Department and Sarhad partner to bring the 'Village of Books' to life in Nandanvan, celebrating literature and community."
"Marathi Language Department and Sarhad partner to bring the 'Village of Books' to life in Nandanvan, celebrating literature and community."Sakal
Updated on

मुंबई : भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरच्या खोऱ्यातील बंदीपोरा जिल्ह्यातील ‘आरागाम’ या गावात मराठीतील पुस्तकांचे गाव फुलणार आहे. मराठी भाषा विभागाच्या राज्य मराठी विकास संस्था आणि पुण्याच्या सरहद संस्थेच्या सहयोगाने हा उपक्रम राबविला जाणार आहे. महाबळेश्वरजवळील ‘भिलार’ या पुस्तकाच्या गावानंतर राज्याबाहेर पहिल्यांदा ‘पुस्तकाचे गाव’ आकाराला येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com