नवीन वर्षात प्रत्येक महिन्याला एक दिवस पाणी बंद राहणार : कल्याण डोंबिवली महापालिका

KDM
KDM

कल्याण : नवीन वर्षात सन 2017- 2018 या वर्षात उल्हास नदीतील पाणी नियोजनासाठी महाराष्ट्र शासनाच्या ठाणे लघू पाटबंधारे विभाग कळवा, ठाणे यांनी घेतलेल्या निर्णयानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बारावे, मोहिली, नेतवली आणि टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रातून 1 जानेवारी 2018 पासून पंधरा दिवसांतून एक दिवस पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन कल्याण डोंबिवली महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांनी केले आहे .  

कल्याण डोबिवली क्षेत्रात पावसाळ्यात पाऊस समाधानकारक पडला असताना कल्याण पूर्वसहित अनेक ठिकाणी पाणी समस्येला सामोरे जावे लागत असताना आता नवीन वर्षात 2017-18 करीता उल्हास नदीतील पाणी नियोजनासाठी महाराष्ट्र शासनाच्या ठाणे लघू पाठबंधारे विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार महापालिकेने स्वतःच्या बारावे, मोहिली , नेतिवली आणि टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रातून जानेवारी 2018 पासून  महिन्यातील एक दिवस दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या दर मंगळवारी 24 तास म्हणजेच सोमवारी रात्री बारा ते मंगळवारी 12 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

तरी नागरिकांनी महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी पाण्याचा साठा करून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभाग कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com