

Aggressive message banners in Mumbai
ESakal
मुंबई : महापालिका निवडणुका जवळ येत असतानाच संपूर्ण मुंबईत अचानकपणे झळकलेल्या काही निनावी फलकांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ‘पायाखालची जमीन एकदा गेली की ती परत मिळत नसते’, ‘मराठी माणसा मुंबई वाचव!’, ‘ही तुझ्या अस्तित्वाची शेवटची लढाई आहे’ आणि ‘या वेळी तुला मराठीसाठी एकत्र यावंच लागेल!’ अशा आक्रमक मजकुराचे हे फलक शहरातील प्रमुख चौक, रेल्वे स्थानक परिसर, बाजारपेठा आणि वस्ती भागांत लावण्यात आले आहेत.