रायगड- पुण्याला जाेडणारा हा मार्ग खचला; रहिवाशांसह पर्यटकांची दगदग वाढली

खचलेली नळीची वाट
खचलेली नळीची वाट

कर्जत  ः मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने मावळ तालुक्‍याला कळकराई गावाला कर्जत तालुक्‍याला जोडणारी नळीची वाट खचली आहे. त्यामुळे रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा सध्या एक जवळचा दुवा पुन्हा जोडण्याची मागणी होत आहे.  

कळकराई ग्रामस्थांना कर्जत येथे येण्यासाठी नळीच्या वाटेचा उपयोग होत असतो. तसेच जवळची बाजारपेठ म्हणून ग्रामस्थ कर्जत तालुक्‍यातील कशळे बाजारपेठेचा व मुंबईला जाण्यासाठी या मार्गाचा उपयोग करत असतात. कळकराई गाव सह्याद्रीच्या डोंगरात वसल्याने येथे येणारे पर्यटकसुद्धा या मार्गाचा मोठ्या प्रमाणात उपयोग करत असतात; मात्र सध्या पावसाचे प्रमाण वाढल्याने या भागातील रस्ते, पायवाटा या निसरड्या झाल्या असून त्या खचल्या असल्याने येथून प्रवास करणे धोकायदायक ठरू शकते. 
खूशखबर : गणपती मूर्ती येणार दारी...

नळीची वाट खचल्याचे फोटो ग्रामस्थांनी सोशल माध्यमांतून व्हायरल केले आहेत. तसेच हा रस्ता बंद राहणार असल्याचे सांगितले आहे. नागरिकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा, असे आवाहनदेखील ग्रामस्थांनी केले आहे. 
नळीची वाट ही खूपच निसर्गरम्य आहे. त्याचा उपयोग ट्रेकीसह आणि पर्यटनासाठीही करतो. प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन हा मार्ग पुन्हा सुरू करण्यासाठी दुरूस्तीची कामे करावीत, अशी मागणी पर्यटक महेंद्र पाटील यांनी केली आहे. 


 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com