
मुंबई: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) घरांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. ‘म्हाडा’ची सोडत जाहीर होताच घरांच्या किमती जास्त असल्याची तक्रार सर्वसामान्यांकडून नेहमी केली जाते, त्या पार्श्वभूमीवर घरांच्या किमतीत ज्या अनावश्यक घटकांची भर पडते, त्याला कात्री लावण्यासाठी ‘म्हाडा’ने समिती नेमली होती, त्या समितीचा अहवाल आठवडाभरात म्हाडा प्राधिकरणाला सादर केला जाणार आहे. या अहवालाच्या अनुषंगाने किमती निश्चित केल्यास म्हाडाच्या घरांच्या किमती आठ ते दहा टक्क्यांनी कमी होऊ शकणार आहेत.