
Mhada
बापू सुळे
मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका अशी ओळख असलेल्या मुंबई महापालिकेने तब्बल पाच-सहा वर्षांपासून म्हाडाची २२५ घरे लटकवून ठेवली आहेत. तानसा जलवाहिनीबाधितांना देण्यासाठी पालिकेकडे घरे नसल्याने म्हाडाने सहा वर्षांपूर्वी ही घरे उपलब्ध करून दिली होती. त्या बदल्यात पालिकेने म्हाडाला ना भाडे दिले, ना मोबदला दिले. त्यामुळे म्हाडाला कोट्यवधी रुपयांच्या महसुलापासून वंचित राहावे लागल्याची बाब समोर आली आहे.