
बापू सुळे
मुंबई : सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या म्हाडाला मुंबईत घरांची बंपर लाॅटरी लागणार आहे. मोतीलालनगर, जीटीबीनगर, कामाठीपुरा, अभ्युदयनगर, आदर्शनगर वरळी, वांद्रे रिक्लेमेशन अशा वेगवेगळ्या वसाहतींचा म्हाडा बांधकाम आणि विकास संस्था (कन्स्ट्रक्शन ॲण्ड डेव्हलपमेंट एजन्सी) नेमून पुनर्विकास करणार आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना पुढील चार-पाच वर्षांत प्रशस्त घरे मिळणार असून म्हाडालाही जवळपास १०-१२ हजार घरांचा साठा उपलब्ध होऊ शकणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या गृहस्वप्नपूर्तीला आणखी बळ मिळणार आहे.