

Rohit Pawar
ESakal
नवी मुंबई : बिवलकर भूखंड वाटप प्रकरणात पुरावे देऊनही जर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कारवाई करीत नसतील तर राज्यात भ्रष्टाचार आणखी फोफवल्याशिवाय राहणार नाही. शासनाचे १,४०० कोटींचे नुकसान केल्याबाबत वन अधिकाऱ्याने तक्रार करूनही बिवलकरसह इतरांवर गुन्हा दाखल केला जात नसल्याने आश्चर्य व्यक्त करीत नवी मुंबई पोलिसांवर सरकारद्वारा दबाव असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे.