

Mumbai Metro
ESakal
मुंबई : मुंबईकरांचा उन्हाळा मेट्रो-२बी आणि ९च्या गारेगार प्रवासाच्या प्रतीक्षेतच जाणार आहे. या दोन्ही मेट्रो मार्गाचे एमएमआरडीएने काम पूर्ण केले असून, मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या (सीआरएमएस) उपस्थितीत सुरक्षा चाचण्या पार पडल्या आहेत. मात्र, त्यांच्याकडून अंतिम सुरक्षा प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्यामुळे सदर दोन्ही मार्गावर गारेगार प्रवासाच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईकरांची प्रतीक्षा कायम राहणार असल्याचे चित्र आहे.