मुंबई : समृद्धी महामार्गावरून सुसाट आलेल्या वाहनधारकांची आमने-ठाणे दरम्यानच्या वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका होणार आहे. त्यासाठी आमने-साकेत (ठाणे) दरम्यान सहा हजार कोटी रुपये खर्चून सुमारे २९ किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग बांधला जाणार आहे. तसेच साकेत-आनंद नगर दरम्यान उन्नत मार्ग तर आणि छेडा नगर (घाटकोपर) - आनंद नगर दरम्यान पूर्व मुक्त मार्गाचा (इस्टर्न फ्री वे) विस्तार केला जात आहे. त्यामुळे सदरचे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर समृद्धीवरून आलेल्या वाहनधारकांना वाहतूक कोंडीशिवाय मुंबईत पोहोचता येणार आहे.