Samruddhi Expressway: समृद्धीवरून थेट मुंबईत पोहोचता येणार, वाहतूक कोंडीतून सुटका होणार; एमएमआरडीएचा नवा प्लॅन

Traffic Jam: समृद्धीवरील वाहनधारकांना वाहतूक कोंडीशिवाय मुंबईत पोहोचता येणार आहे. यासाठी २९ किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग बांधला जाणार आहे.
Samruddhi Expressway
Samruddhi Expressway sakal
Updated on

मुंबई : समृद्धी महामार्गावरून सुसाट आलेल्या वाहनधारकांची आमने-ठाणे दरम्यानच्या वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका होणार आहे. त्यासाठी आमने-साकेत (ठाणे) दरम्यान सहा हजार कोटी रुपये खर्चून सुमारे २९ किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग बांधला जाणार आहे. तसेच साकेत-आनंद नगर दरम्यान उन्नत मार्ग तर आणि छेडा नगर (घाटकोपर) - आनंद नगर दरम्यान पूर्व मुक्त मार्गाचा (इस्टर्न फ्री वे) विस्तार केला जात आहे. त्यामुळे सदरचे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर समृद्धीवरून आलेल्या वाहनधारकांना वाहतूक कोंडीशिवाय मुंबईत पोहोचता येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com