दिलासा! मोडकसागर, तुळशी, विहारनंतर तानसा तलावही ओव्हरफ्लो; मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली

दिलासा! मोडकसागर, तुळशी, विहारनंतर तानसा तलावही ओव्हरफ्लो; मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली


मुंबई : मुंबईला पाणी पुरवठा करणार तानसा तलावही आज संध्याकाळी ओसंडून वाहू लागला आहे.यापुर्वी मोडकसागर,तुळशी आणि विहार हे तीन तलाव भरले होते.तर,मध्य वैतरणा तलावाही सकाळ पर्यंत 93 टक्के भरला होता.

मोडकसगार तलावात गुरुवारी सकाळी 1 लाख 37 हजार 815 दशलक्ष लिटर साठा होता.तलावाच्या एकूण क्षमतेच्या 95 टक्के पाणीसाठा होता.दिवसभरात साठ्यात पाच टक्‍क्‍यांनी वाढ झाली असून आता 1 लाख 45 हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा आहे.संध्याकाळी 7 वाजल्याच्या सुमारात तानसा तलाव ओसंडून वाहू लागला. तलाव क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने मुंबई महानगर पालिकेने 10 टक्के पाणी कपात कमी केली आहे.5 ऑगस्ट पासून मुंबईत 20 टक्के पाणी कपात लागू होती.तर,उद्या पासून ही 10 टक्के लागू राहाणार आहे.सध्या तलावांमध्ये 87.20 टक्के पाणीसाठा आहे.वर्षभर सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते.गुरुवार सकाळ पर्यंत 12 लाख 62 हजार 119 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा होता.

गुरुवार सकाळचा पाणीसाठा (दशलक्ष लिटर)

  • -अप्पर वैतरणा - 163299
  • -मोडकसागर - 128925
  • -तानसा - 137815
  • - मध्य वैतरणा - 181741
  • -भातसा - 614595
  • - विहार - 27698
  • -तुळशी - 8046 

--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com