

Rainfall Activity to Remain Uneven Till June 15, Says Weather Update
मुंबई: नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) दक्षिण कोकणात दाखल झाले असून, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये नऊ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र, त्यानंतर किमान १५ जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर, तसेच मॉन्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, असे आवाहन राज्याच्या कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.