

Mumbai Fire Case in Diwali
ESakal
मुंबई : दिवाळीमध्ये मुंबईत आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. फटाके, शॉर्टसर्किट आणि विजेच्या उपकरणांमुळे गेल्या सहा दिवसांत तब्बल २५ पेक्षा अधिक आगीच्या घटना नोंदल्या गेल्या आहेत. या सर्व घटनांवर मुंबई अग्निशमन दलाने तत्परतेने कारवाई करून मोठी जीवितहानी टळली असली तरी काही ठिकाणी मृत्यू आणि जखमींची नोंद झाली आहे.