Varsha Gaikwad Criticism On BJP
मुंबई
Varsha Gaikwad: भाजपने मुंबईला गॅस चेंबर केले! खासदार वर्षा गायकवाड यांचा आरोप
Varsha Gaikwad Says On Mumbai Pollution: महायुती सरकारने विकासाच्या नावाखाली मुंबईला गॅस चेंबर केले आहे, असा आरोप खासदार वर्षा गायकवाड यांनी केला.
मुंबई : भाजप, महायुती सरकारने विकासाच्या नावाखाली मुंबईला गॅस चेंबर केले आहे, असा आरोप करीत प्रदूषण प्रचंड वाढले आहे, लहान मुले आजारी पडत आहेत, वृद्धांना श्वास घेणे कठीण झाले आहे. ही सार्वजनिक आरोग्याची आणीबाणी नाही तर काय आहे, असा संतप्त सवाल मुंबई काँग्रेस अध्यक्ष व खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे. जो नियमांचे उल्लंघन करेल तो कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कठोर कारवाई करा आणि त्याला शिक्षा करा, अशी मागणीदेखील वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

