

Mumbai Dam Water Level
ESakal
मुंबई : जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये ८८.४९ टक्क्यांवर जलसाठा उपलब्ध झाला आहे. पाच-सहा दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात तुरळक सरी पडत आहेत. दरम्यान, एल निनोच्या पार्श्वभूमीवर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये तुरळक सरी बरसण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे शंभर टक्के जलसाठा उपलब्ध होत नाही, तोपर्यंत १० टक्के पाणीकपात कायम राहणार असल्याचे जलअभियंता विभागाने सांगितले.