

Mumbai-Ahmedabad Highway pothole
ESakal
कासा : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील महालक्ष्मी उड्डाणपुलावर अवघ्या चार दिवसांत पुन्हा मोठा आरपार खड्डा पडल्याने पुलाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार खड्डे पडत असल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, मोठ्या अपघाताची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता. ६) महामार्ग प्राधिकरणाने आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांची टीम घटनास्थळी बोलावून पुलाची तांत्रिक पाहणी करून घेतली. तज्ज्ञांकडून लवकरच अहवाल सादर करण्यात येणार असून, त्यानुसार कायमस्वरूपी दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे.