Mumbai: बारवी धरण काठोकाठ आले भरत; धरण काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या शहरांमध्ये गेले काही दिवस पाऊस पडतोय.
Mumbai
MumbaiSakal

बदलापूर - सतत सुरू असलेल्या पावसामुळे बारवी धरणातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. गुरुवारी सकाळी 7 वाजता धरणाची पातळी 70.64 मी एवढी झाली असून धरण काठोकाठ भरले आहे.

बारवी धरणाची पाणी पातळी 72.60 मीटर असून धरणावर स्वयंचलित दरवाजे कधीही उघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.यामुळे बारवी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तानसा, भातसा पाठोपाठ बारवी धरण देखील भरल्याने ठाणे जिल्ह्याचा पाणी प्रश्न मिटला आहे.

Mumbai
Mumbai News : टॅक्सीत विसरलेला लाखांचा ऐवज महिलेला परत मिळवून देण्यात पोलिसांना यश

ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या शहरांमध्ये गेले काही दिवस पाऊस पडतोय.तसेच ठाणे जिल्हातील धरण क्षेत्रात सुद्धा समाधानकारक पाऊस झाला आहे.

बदलापूर मधील बारवी धरण क्षेत्रात सुद्धा पाऊस चांगला झाला असल्याने बारवी धरण भरले आहे.दरम्यान बारवी धरण विभागाचे कार्यकारी अभियंता दुशांत उईके यांनी अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, भिवंडी तालुक्याच्या तहसीलदारांना बारवी धरणाच्या पाण्याच्या पातळीबाबत पत्र दिले आहे.या पत्रामध्ये धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे.

Mumbai
Mumbai News : टॅक्सीत विसरलेला लाखांचा ऐवज महिलेला परत मिळवून देण्यात पोलिसांना यश

बारवी धरणावरती 11 स्वयंचलित वक्रद्वारे बसविण्यात आलेली आहेत व त्याची उच्चतम विसर्ग पातळी 72.60 मीटर आहे. बारवी धरणाची पाणी पातळी 72.60 मी. वर गेल्यानंतर स्वयंचलित वक्रद्वारे आपोआप उघडून पाण्याचा विसर्ग सुरु होतो व स्वयंचलित वक्रद्वारे आपोआप बंद होऊन पाण्याचा विसर्ग थांबेल.

सद्यस्थितीतील चालू असलेल्या अतिवृष्टीमुळे उल्हास नदीत पूर परिस्थिती उद्भवलेली असल्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करणे शक्य होत नसल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाटयाने वाढ होत आहे.

या सर्व बाबींचा विचार करता धरणाची पाणी पातळी कधीही 72.60 मी. तलांक गाठून स्वयंचलित वक्रद्वारे आपोआप उघडून बारवी धरणातून बारवी नदीत पाण्याचा विसर्ग सुरु होऊ शकतो.

Mumbai
Mumbai : मणक्‍याला इजा होण्याच्या तक्रारींत वाढ; खड्ड्यांमुळे निरनिराळ्या व्‍याधी

बारवी नदीच्या तीरावरील अस्नोली, चांदप, चांदपपाडा, पिंपळोली, सागांव, पाटीलपाडा, पादोरपाडा, कारंद, मोन्याचापाडा, चोण, रहाटोली व नदी काठावरील इतर शहरे व शहरातील सरकारी यंत्रणा तसेच गावांतील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील यांनी गांवातील नागरिकांना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत,

असलेबाबत सतर्कतेच्या सूचना एमआयडीसी प्रशासनाने दिल्या आहेत. पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर या काळात कोणत्याही प्रकारे वाहत्या पाण्यात नागरीकांना व पर्यटकांना प्रवेश न करण्याबाबत तसेच नदीच्या पात्रात पोहण्यास मज्जाय एमआयडीसी ने केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com