मुंबई
Mumbai Best Bus Accident: बेस्टच्या अपघातात; तीन वर्षांत ६२ मृत्यू; भाडेतत्त्वामुळे ६५ टक्के जीवितहानी
Latest Mumbai News: कंत्राटीकरण संपवून त्याऐवजी बेस्टने स्वतः बसगाड्या चालवाव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
Mumbai: कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात सात जणांचा मृत्यू, तर ४२ जण जखमी झाले होते. या अपघाताच्या चौकशीसाठी बेस्टने चार सदस्यीय समितीची स्थापना केली आहे.
दरम्यान, मागील तीन वर्षांमध्ये बेस्ट बसच्या विविध अपघातांत ६२ जणांचा मृत्यू झाला, तर १७४ जण जखमी झाले. त्यातही भाडेतत्त्वावरील बसमुळे ६५ टक्के मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.