Four Dead Ten Critical After BEST Bus Accident In Bhandup
Esakal
मुंबई
घरी जाण्यासाठी बसची वाट बघत होते, बस काळ बनून आली; बेस्टने चिरडल्यानं चौघांचा मृत्यू, १० गंभीर
Bhandup BEST bus Accident मुंबईत भांडुपमध्ये बेस्ट बसने चिरडल्यानं चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. तर या अपघातात दहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपाचर सुरू आहेत.
मुंबईत भांडुप परिसरात बेस्ट बसनं १४ जणांना चिरडल्याची घटना घडलीय. नगरदास नगरच्या दिशेनं जाणाऱ्या बसने चिरडल्यानं ४ जणांचा मृत्यू झालाय तर दहा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आलीय. अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये एका परिचारिकेसह तीन महिलांचा समावेश आहे. रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

