

mumbai local
esakal
मुंबई: मध्य रेल्वेच्या वाहतुकीत सलग दुसऱ्या दिवशी मोठा खोळंबा निर्माण झाला आहे. अचानक पावसामुळे आधीच हैराण झालेल्या मुंबईकरांना आता लोकल गाड्यांच्या उशिराने धावण्याचा फटका बसत आहे. कल्याण-सीएसएमटी मार्गावरील लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर एकूणच मध्य रेल्वेवरील वाहतूक ३० मिनिटे मागे पडली आहे. यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड रागाचा स्फोट झाला असून, स्टेशनांवर तुफान गर्दी उसळली आहे.