Mumbai News: मुंबईकरांना हुतात्म्यांचा विसर! स्मारकाला अभिवादनासाठी ना तरुणाई, ना सामान्य माणूस

Martyrs Day: हुतात्मा स्मृतिदिनानिमित्त राज्यभरात हुतात्म्यांचे स्मरण करण्यात आले. मात्र हुतात्मा स्मारकाकडे अभिवादनासाठी तरुणाई किंवा सामान्य माणूस नसल्यामुळे याबाबत अनेकांनी खंत व्यक्त केली.
Martyrs Day

Martyrs Day

ESakal

Updated on

नितीन जगताप

मुंबई : २१ नोव्हेंबर हा दिवस ‘हुतात्मा स्मृतिदिन’ म्हणून पाळला जातो. या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्राणाचे बलिदान देणाऱ्या १०६ हुतात्म्यांचे आज सर्वत्र स्मरण करण्यात आले. मात्र, फोर्टसारख्या गजबजलेल्या भागातील हुतात्मा स्मारकाकडे, नेतेमंडळी वगळता सामान्य मुंबईकर, विशेषतः तरुणाई फिरकताना दिसली नाही. ज्यांच्या त्यागामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली, त्याबद्दल आजच्या पिढीची आस्था कमी होत चालली आहे, अशी खंत अनेकांनी व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com