

Mumbai Dam Water Level
ESakal
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडल्याने धरणातील जलसाठ्यात वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत ६.०६ टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा २५ जुलैला ८३.६८ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरण क्षेत्रातील पावसामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.