

Mumbai Dam Water Stock
ESakal
मुंबई : मुंबईला पाणी पुरविणाऱ्या धरणांमध्ये पावसाळ्यात पालापाचोळा, माती यामुळे मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने धरणांमधील पाण्याची पातळी घटली आहे. त्यामुळे स्पर्धात्मक निविदा काढून सर्वच धरणांमधील गाळ काढण्याचा नियोजनबद्ध कार्यक्रम आखून धरणांमधील गाळ काढण्यात यावा, अशी मागणी पालिका प्रशासनाकडे एका ठरवाच्या सूचनेद्वारे नगरसेवकांनी केली आहे.