

Mumbai Goa Highway Traffic Updates
Esakal
गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहने वाढली आहेत. यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून ३ तासाच्या प्रवासाला तब्बल १२ तास लागल्याचं समोर आलंय. शनिवारी रात्री १० वाजता दिव्याहून निघालेल्या बसला माणगावला पोहोचायला ९ वाजले. वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांनी संताप व्यक्त केली. एसटी बसमध्ये महिला, लहान मुलं आणि वृद्ध असल्यानं त्यांना त्रास सहन करावा लागल्याचंही प्रवाशांनी सांगितलं.