

Mumbai Dam Water Stock
ESakal
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये सुमारे ५७ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. गेल्या २४ तासांत झालेल्या पावसामुळे जलसाठ्यात सुमारे ३.७० टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांत पावसाने तलावांच्या पाणलोट क्षेत्रात दडी मारल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते; पण आता पाऊस पुन्हा सक्रिय झाल्याने तलावांतील जलसाठा वाढू लागला आहे.