Mumbai High Court
esakal
मुंबई : पावसात मॅनहोलमध्ये पडून वाहून गेलेल्या १३ वर्षांच्या मुलाच्या कुटुंबीयांना कल्याण-डोंबिवली महापालिकेने अद्याप भरपाई न दिल्याची उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. २१) गंभीर दखल घेतली. याबाबत निर्णय घेण्यात दिरंगाई करणाऱ्या महापालिकेच्या निष्काळजीवरही नाराजी व्यक्त केली. मुलाच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याचा निर्णय तातडीने न घेतल्यास आम्ही त्याबाबत आदेश देऊ, असा इशाराही न्यायालयाने महापालिकेला दिला.