मुंबईत पारा आज गाठणार चाळिशी?

मुंबईत पारा आज गाठणार चाळिशी?

नवी मुंबई - आठवडाभरापासून मुंबईसह इतर शहरांच्या तापमानात वाढ होत आहे. वाढत्या तापमानाच्या या कचाट्यातून नवी मुंबईही सुटलेली नाही. सोमवारी नवी मुंबईच्या तापमानाची नोंद ३६.६६ अंश सेल्सिअस झाली. स्कायमेंटनुसार मात्र नवी मुंबईत पाऱ्याने चाळिशी गाठली होती. हवा कोरडी असल्याने उन्हाच्या झळा जाणवत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. शहराच्या तापमानात उद्या (ता. २६) ३९ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होण्याची शक्‍यता हवामान विभागाने व्यक्त केली असल्याने नागरिकांना आवश्‍यक ती खबरदारी घ्यावी लागणार आहे.

पूर्वेकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील अनेक शहरांचे तापमान चाळिशीपर्यंत पोहोचले आहे. आठवडाभर हीच स्थिती कायम राहणार असून उद्यापासून (ता. २६) तापमानात आणखी वाढ होईल, अशी माहिती हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. सोमवारी (ता. २५) मुंबईचे तापमान ३३.५ अंश सेल्शिअस होते; तर आर्द्रता ९० टक्के नोंद झाली. ‘सफर’च्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार नवी मुंबईत पाऱ्याने छत्तीशी गाठली असून आर्द्रता ६२ टक्के नोंदवण्यात आली आहे. गेल्या वर्षी २६ मार्चला उच्चांकी म्हणजे ४१ अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद झाली होती.

प्रदूषणात वाढ
शहरातील प्रदूषित वायूची आणि पर्टीक्‍युलेट मॅटरचे (घनरूप दूषित कण) हवेतील प्रमाण यावरून हवेची गुणवत्ता ठरवण्याचे काम ‘सफर’ संस्था करते. या संस्थेच्या संकेतस्थळावर हवेतील प्रदूषणाची पातळी सोमवारी दुपारी १ वाजता ३९५; तर ३ वाजता ३६९ नोंदवण्यात आली आहे. हवेतील प्रदूषित घटकांचे प्रमाण वाढले असल्याची नोंद ‘सफर’ने केली आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com