

Exclusive News
esakal
नितीन बिनेकर
मुंबई: मुंबई उपनगरीय रेल्वेवर देशातील सर्वाधिक विना तिकीट प्रवासाची प्रकरणे नोंदवली जात असताना, अशा प्रवाशांना लवकरच अधिक आर्थिक फटका बसणार आहे. जनविश्वास (दुरुस्ती) कायदा-२०२६ अंतर्गत रेल्वे कायद्यात करण्यात आलेल्या बदलांनुसार, विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना संपूर्ण भाड्यासह किमान ५०० रुपये अतिरिक्त शुल्क भरावे लागण्याची शक्यता आहे. सध्या असलेले किमान २५० रुपयांचे अतिरिक्त शुल्क दुप्पट होणार असून, रेल्वे मंडळाच्या स्वतंत्र अधिसूचनेनंतर ही तरतूद लागू होणार आहे.