Mumbai"नकली हिंदुत्ववादी बरेच निर्माण झालेत"

कोरोना कालखंडानंतर प्रथमच श्री मलंगगड यात्रा पुन्हा मोठ्या उत्साहात भरविण्यात आली आहे. या यात्रेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली आहे. शिंदे व ठाकरे गटाकडून यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले.
rajan vichare morcha
rajan vichare morchasakal

डोंबिवली- आता नकली हिंदुत्ववादी बरेच निर्माण झालेले आहेत. अशी जाहीर टिका विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची सरकारवर केली आहे. गेली अनेक वर्ष श्री मलंगडाला हिंदुत्वाचा दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न सुरू आहेत. आता हिंदुत्वाचे सरकार आल्याचा दावा केला जात आहे या प्रश्नावर उत्तर देताना विरोधी पक्षनेते दानवे यांनी सरकारवर टिका केली.

कोरोना कालखंडानंतर प्रथमच श्री मलंगगड यात्रा पुन्हा मोठ्या उत्साहात भरविण्यात आली आहे. या यात्रेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली आहे. शिंदे व ठाकरे गटाकडून यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले.

शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार राजन विचारे, जिल्हा संपर्क पमुख सुभाष भोईर, माजी आमदार रुपेश म्हात्रे, विजय साळवी यांसह अनेक पदाधिकारी यात्रेला उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना विरोधी पक्षनेते दानवे म्हणाले, जे खरे हिंदुत्ववादी होते ते पुन्हा येणार आहेत. त्यावेळी आम्ही निश्चित या ठिकाणी हिंदूंचे पवित्र तीर्थस्थान असावे, शासनाचा त्याला दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करु.

कोरोना काळ होता त्यावेळेस या यात्रेला कोणी आले तरी होते का ? आता बरेच जण येत आहेत. आता आम्ही पुन्हा नव्या ताकदीने पुढाकार घेत हा उत्सव सुरू केला आहे. आणि खऱ्या अर्थाने हिंदूंना एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला आहे.

दिघे साहेबांनी 1982 - 83 मध्ये हा उत्सव सुरू केला. श्री मलंगगड उत्सव हा केवळ ठाणे जिल्ह्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चिला जाणार उत्सव आहे. या उत्सवाला येण्याच भाग्य मला लाभलं. श्री नवनाथ यांचं हे एक स्थान आहे.

हिंदूंची ही जी प्रथा परंपरा आहे त्यामध्ये नवनाथ यांच्या कार्याचा उल्लेख येतो. येथील समाधी स्थळावर काही लोकांनी आधीच्या काळात वेगळ्या पद्धतीने वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न केला. परंतु दिघे साहेबांनी ज्यावेळेस पुढाकार घेतला आणि नेतृत्व केलं. त्यावेळी त्यानंतर समस्त हिंदूंचा हा उत्सव झाला आणि या उत्सवात सहभागी होणे हे मी माझे भाग्य समजतो.मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने जातील, पण सर्वसामान्य नागरिक पायी जातात ओरिजनल पार्टी बाळासाहेब यांचीच

  • - खासदार राजन विचारे

बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आणि आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली ही मलंगगड मुक्तीची वहिवाट सुरू झाली आहे. 39 वर्षे झाली आज ठाणे जिल्ह्यातून महाराष्ट्रातून सर्व मंडळी या ठिकाणी उत्सवासाठी येत असतात. 39 वर्ष झाली परंतु आजही दुर्दैवाने याला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यासाठी आपण वारंवार विनंती करत आहोत. या ठिकाणी तुम्ही बघितल असेल गेल्या पंधरा वर्षापासून फर्निक्युलर ट्रॉली चे काम सुरू आहे.

जे ज्येष्ठ नागरिक आहेत महिला यांना या ठिकाणी मलंगडावर जायचं असेल तरी जाता येत नाही. ज्या सुविधा या ठिकाणी द्यायला पाहिजे होत्या त्या सुविधा गेल्या पंधरा वर्षांमध्ये दिल्या गेल्या नाहीत. म्हणून आमचे मागणे आहे की या ठिकाणी सुविधा दिल्या जाव्यात. मुख्यमंत्री या ठिकाणी येतील आणि हेलिकॉप्टरने जातील परंतु सर्वसामान्य आमचा शिवसैनिक आहे, कित्येक वर्ष पायी जात असतो. पायऱ्या बरोबर नाहीत, पिण्याचे पाणीची व्यवस्था नाही

अशा पद्धतीने प्रत्येक हिंदू नागरिकाला त्या ठिकाणी जायला हव्या त्या सर्व सुविधा शासनाच्या माध्यमातून इथे दिल्या गेल्या पाहिजे. त्यासाठी त्यांना देव सुबुद्धी देवो. मलंगगडा साठी सुद्धा त्यांनी लक्ष घालावे.

शिवसैनिकांना त्रास देण्याचे बंद करावे. शाखेवर कब्जा मिळवणे बंद करावे. चांगल्या कामासाठी आपली स्वतःची ताकद त्या ठिकाणी वापरावी जे खोटे गुन्हे दाखल केले जातात आमच्या शिवसैनिकांवरती ते त्यांनी बंद करावे. अशा प्रकारे मलंगडाच्या मुक्तीसाठी ज्या पद्धतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे यांचे नाव ते घेतात त्यांच्या विचारांचा वारसा त्यांनी जपावा परंतु ते तसे करत नाहीत. या ठिकाणी कोणत्याही गोष्टीच राजकारण न करता याचा विकास करावा.

गट एकच आहे शिवसेना. ओरिजनल पार्टी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेब यांची आहे. हे सर्व घडवलेले जेवढे शिवसैनिक आहेत हे सर्व त्यांचे अनुयायी आहेत. त्यांना एबी फॉर्म शिवसेनेने उद्धव साहेबांनी दिला. लोकांनी मतदान कोणाच्या आव्हानानुसार केलं याच त्यांनी भान ठेवावं आणि मला वाटतं अशा पवित्र ठिकाणी चांगलं काम करावं अशी विनंती विचारे यांनी केली.

लोकांची खऱ्या अर्थाने सोय आहे त्या कामात दुर्लक्ष झाले हे सर्वांनी पाहिले त्यामुळे फर्निक्युलर ट्रॉली चे काम बंद आहे ते लवकरा लवकर सुरू करून पुढच्या वर्षी तरी या यात्रेला याचा आनंद घेता येईल आणि यात्रा सुखरूप होईल त्यामुळे ही ट्रॉली लवकर सुरू करावी अशी सर्व भाविकांची मागणी असल्याचे जिल्हा संपर्क प्रमुख सुभाष भोईर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com