मुंबई : नवाब मलिक यांचे आरोप बिनबुडाचे ; मंगल प्रभात लोढा

मलिक यांनी माफी मागावी
Mumbai
MumbaiSakal

मुंबई : नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अमली पदार्थांसंदर्भात केलेले आरोप बिनबुडाचे असून याबाबत त्यांनी फडणवीस यांची माफी मागावी अशी मागणी मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांचे ड्रग्ज विक्रेत्यांशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. या आरोपात एक टक्का देखील तथ्य आढळल्यास मी राजकीय व सामाजिक जीवनातून संन्यास घेईन. तर तथ्य न आढळल्यास मलिक यांनी फडणवीस यांच्या कुटुंबाची माफी मागावी, असे जाहीर आव्हान लोढा यांनी दिले आहे.

मलिक यांनी फडणवीस यांच्या कुटुंबावर केलेले आरोप निंदनीय असुन त्यात तत्थ्य नाही. महाष्ट्रातील जनतेची दिशाभुल करण्यासाठी मलिक हे प्रशासकीय अधिकारी तसेच नेत्यांवर बिनबुडाचे आरोप करीत असल्याचा आरोपही लोढा यांनी केला आहे.

Mumbai
नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवरील चुकीचे आरोप थांबवावे : रामदास आठवले

महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेला फडणवीस यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर विश्वास आहे. महाराष्ट्र भ्रष्ट्राचार व अत्याचाराने होरपळला गेला आहे. याकडे दुर्लक्ष करून मलिक हे दुसऱ्यावर आरोप करण्यात आपला वेळ वाया घालवत असल्याचा आरोपही लोढा यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com