Mumbai Water Dam: मुंबईतील धरण होणार ओव्हरफ्लो! वर्षभर पुरेण्याइतका पाणीसाठा जमा; टंचाईची चिंताही मिटली

Dam Water Level: गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस पडत असल्याने मुंबईला पाणी पुरविणाऱ्या सर्व तलावांमध्ये ८९ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
Mumbai Water Level
Mumbai Water Level ESakal
Updated on

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस पडत असल्याने मुंबईला पाणी पुरविणाऱ्या सर्व तलावांमध्ये १२,८३,७४१ दक्षलक्ष लिटर म्हणजे ८९ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. उपलब्ध जलसाठा हा पुढील ३१८ दिवस म्हणजेच पुढील १० जून २०२६ पर्यंत पुरेल इतका आहे. त्यामुळे मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com