
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस पडत असल्याने मुंबईला पाणी पुरविणाऱ्या सर्व तलावांमध्ये १२,८३,७४१ दक्षलक्ष लिटर म्हणजे ८९ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. उपलब्ध जलसाठा हा पुढील ३१८ दिवस म्हणजेच पुढील १० जून २०२६ पर्यंत पुरेल इतका आहे. त्यामुळे मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.