मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील सर्वात मोठी बातमी

मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील सर्वात मोठी बातमी

मुंबई:  व्यापारी मनसुख हिरेन हत्या प्रकरणात महाराष्ट्र एटीएसनं दोन आरोपींना अटक केली आहे. त्यामुळे मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचं गूढ उकलल्याचा दावा एटीएस करत आहे. तसंच हिरेन यांच्या हत्या प्रकरणात अटक केलेल्या या दोन आरोपींचा हात असल्याचा दावाही एटीएसनं केला आहे. 

या हत्या प्रकरणात या दोघांचा हात असल्याचा ATS  ला संशय आहे. मनसुखचा मृतदेह ज्या दिवशी मुंब्रा रेतीबंदर परिसरात आढळला होता. त्यावेळी हे दोघं घटनास्थळी होते असं ATS च्या सुत्रांकडून समजतेय. या दोघांची हिरेन यांच्या हत्या प्रकरणात नेमकी काय भूमिका होती का? याचा एटीएस तपास करत आहे.

अटक करण्यात आलेल्या दोघांना आधी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं. मात्र, चौकशीनंतर त्या दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती एएनआयनं दिली आहे. यात निलंबित पोलिस हवालदार विनायक शिंदे आणि बुकी नरेश धरे या दोघांना एटीएसनं अटक केली आहे.

आज सकाळी 9 च्या सुमारास या दोघांच्या अटकेची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून दोघांना आज ठाणे न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती ATS ने दिली आहे.

व्यापारी मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्याच्या खाडीत सापडला होता. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर ठेवण्यात आलेल्या स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या सापडल्यामुळे खळबळ उडाली होती. या कारमुळे मनसुख हिरेन यांचं नाव समोर आलं होतं. ही कार त्यांच्या मालकीचं असल्याचं बोललं जातं होतं आणि त्यानंतर त्यांचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं. दरम्यान आता या दोन जणांना अटक केल्यानंतर हिरेन प्रकरणात मोठा खुलासा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

mumbai news Mansukh Hiren case ATS has Two Accused arrested

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com