स्वच्छता मोहिमेचे सकारात्मक परिणाम असून त्यामुळेच मुंबईतील हवेचा दर्जा सुधारत असल्याचा दावा पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी केली आहे.
पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आज सकाळी ७.३० वाजेपासून केलेल्या स्वच्छता मोहिमेच्या दौ-यात या सर्व कार्यवाहीची पाहणी करतानाच स्वतः सखोल स्वच्छता मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग देखील घेतला. यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे आणि पालिका अधिकारी यावेळी उपस्थित होते.
दोन महिन्यांपूर्वी ३०० ते ३५० दरम्यान असणारा वायू गुणवत्ता निर्देशांक आता १००- १५० पर्यंत खाली आला आहे. काही ठिकाणी तर हवेचा गुणवत्ता निर्देशांक अवघा ५० आहे. पालिकेच्या विविध उपाययोजनांमुळे वाय प्रदूषणात घट झाली आहे. साथरोग आजारांमध्ये देखील घट झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट असल्याचेही चहल यांनी स्पष्ट केले आहे.
म्हाडा व तत्सम प्राधिकरणांच्या ज्या सार्वजनिक शौचालयांमध्ये पुरेशी विद्युत प्रकाश व्यवस्था नसेल तिथे आठवडाभरात विद्युत प्रकाश व्यवस्था पुरवावी, असे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले. पालिकेकडून प्रत्येक शनिवारी सर्व विभागात सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. आज सर्व २५ प्रशासकीय विभागात लोकसहभागातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
त्यास सर्वत्र स्थानिक नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. रस्ते, पदपथ, लहान-सहान गल्लीबोळांमध्ये असलेला घनकचरा तसेच टाकाऊ वस्तू पूर्णपणे काढणे, ब्रशिंग करुन रस्ते, पदपथांवरील धूळ काढणे, त्यानंतर पाण्याने धुणे ही सर्व कार्यवाही करतानाच रस्त्यांवर उगवलेली खुरटी झाडीझुडपे समूळ काढणे, अवैध जाहिरात फलक हटविणे, कीटकनाशक धूर फवारणी, पावसाळी जाळ्या- गटारे व नाले यांची स्वच्छता, धोकादायक तारांचे जंजाळ काढणे आदी विविध कामे सखोल स्वच्छता मोहिमेतून करण्यात येत आहेत. यामुळे सकारात्म परिणाम दिसून येत असल्याचे पालिका आयुक्त चहल यांनी स्पष्ट केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.