वृक्ष तोड, बांधकामे रोखण्यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत

वृक्ष तोड, बांधकामे रोखण्यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत

कल्याण - कल्याण डोंबिवली पालिकेच्या खाडी किनाऱ्यावर कांदळवन तसेच तिवरांची होत असलेली तोडणी आणि परिसरात उभी राहणारी अनधिकृत बांधकामे याची ठाणे जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. ही वृक्ष तोड थांबवण्यासाठी तसेच बांधकामे रोखण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने पावले उचलावीत असे पत्र पालिकेला पाठवण्यात आले आहे. कल्याणचे तहसिलदार अमित सानप‌ यांनी पालिकेला हे पत्र पाठवले आहे. 

मोठागाव, ठाकुर्ली खाडीलगत पूर्वे स्मशानभूमी, डोंबिवली पश्चिम परिसर, कोपर खाडीलगत, भोपर, महाराष्ट्रनगर, देवीचा पाडा या परिसरात तिवराच्या झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणावर होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे येत असल्याचे पत्रात म्हटले आहे. या संदर्भात डोंबिवली पोलिस स्थानक तसेच विष्णू नगर पोलिस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय न्यायालयानेही या कत्तलीची तसेच बेकायदेशीरपणे होणाऱ्या रेती उपशाची दखल घेतली आहे. पालिका प्रशासनाने यावर कारवाई करावी असे पत्रात नमूद केले आहे. घनकचरा व्यवस्थापन विषयीच्या याचिकेतही पालिकेचे सी आर झेडमधील बेकायदा बांधकामांकडे दुर्लक्ष असल्याचे सांगण्यात आले आहे. 

पालिकेतील अधिकाऱ्यांच्या संगनमताने ही बेकायदा बांधकामे होत असल्याची चर्चा आहे. भू माफिया या परिसरात चाळी बांधत असून त्याकडे पालिका अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही होत आहे. खाडी किनारा विकसित करण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर ठाणे, कल्याण, नवी मुंबई तसेच मुंबई ही शहरे जल वाहतुकीने जोडण्याची योजनाही आखण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कांदळवनांचे संरक्षण तसेच सी आर झेडमधील बेकायदा बांधकामे यांचा गांभीर्याने विचार होणे अत्यंत आवश्यक आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com