Mumbai News : एकीकडे कडक उन्हामुळे जिवाची काहिली; त्यात बसणार पाणीकपातीची झळ

पाण्याविना मुंबई कोरडी; मुंबईकरांना बसणार पाणीकपातीचा फटका
Water Tap
Water TapSakal

मुंबई, ता. २९ : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या बऱ्यापैकी पाणीसाठा शिल्लक आहे; तरीही मुंबईकरांना तब्बल महिनाभर १५ टक्के पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या जलबोगद्याला ठाण्यात कूपनलिकेच्या खोदकामामुळे गळती निर्माण झाल्याने मुंबईत पाण्याची समस्या भेडसावणार आहे.

दुरुस्तीचे काम शुक्रवार (ता. ३१) पासून हाती घेण्यात येणार असून ते अभियांत्रिकीच्या दृष्टीने मोठे आव्हान ठरणार आहे. सुमारे दीडशे फूट खोल उतरून जलवाहिनीची दुरुस्ती होणार आहे. एकीकडे कडक उन्हामुळे जिवाची काहिली होत असताना पाणीकपातीच्या झळांनी मुंबईकर बेजार होणार आहे.

जलबोगद्याच्या दुरुस्तीचे काम मुंबई महापालिकेचा अभियांत्रिकी विभाग करणार आहे. दुरुस्तीकाम अत्यंत किचकट असून त्यासाठी सुमारे दीडशे फूट जमिनीखाली उतरावे लागणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात यंत्रसामुग्री आणि कामगार व तंत्रज्ञ लागणार आहेत. जशी यंत्रे लागतील तशी कामगारांची गरज भासणार आहे.

जलबोगदा बंद करून त्यातील पाणी काढून टाकण्यात येणार आहे. त्यानंतर दुरुस्तीकाम सुरू केले जाईल. काम महिनाभर चालणार आहे, अशी माहिती महापालिकेचे अभियंते (प्रकल्प) वसंत गायकवाड यांनी दिली. दुरुस्तीकामामुळे संपूर्ण मुंबईला पाणीकपात सहन करावी लागणार आहे. मुंबईच्या अनेक भागांत आधीच कमी दाबाने आणि

अपुरा पुरवठा होत असतो. त्यात आता पाणीकपात लागू होणार असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com