

Bringing Smiles Back: Mumbai Railway Police’s Humanitarian Mission
नितीन बिनेकर
मुंबई : मोठी स्वप्ने पाहत, रागाच्या भरात किंवा घरातील तणावामुळे अनेक अल्पवयीन मुले-मुली मुंबईकडे धाव घेतात. मात्र, या मायानगरीत पाऊल ठेवताच काहीजण मानव तस्करी, बालमजुरी आणि गुन्हेगारीच्या अंधाऱ्या जाळ्यात अडकतात. अशा वेळी त्यांच्या आयुष्यात आशेचा किरण ठरते ती मुंबई रेल्वे पोलिसांची अनैतिक मानवी वाहतूक शाखा (एएचटीयु ) हरवलेल्या मुलांना सुरक्षितपणे शोधून पुन्हा कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्याचे संवेदनशील काम या शाखेकडून सातत्याने केले जात आहे.