
मुंबईसह उपनगरात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. गुरुवारी राज्यात मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यातील आतापर्यंत चांगला पाऊस पडला असल्याची माहिती देण्यात आली आहे. अरबी समुद्रात तीन मीटर पर्यंत लाटा उसळणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. दरम्यान आज मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर रेड अलर्ट जारी करण्यात आला आह. मुंबई, ठाणे, पालघर या भागात गेल्या २४ तासांत सर्वत्र मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला आहे.