Mumbai : टीसी आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या वादामुळे राजधानी एक्सप्रेसच्या खोळंबा !

अधिकाऱ्यांचा गैरवापर करत जळगाव स्थानकात राजधानी एक्सप्रेस थांबवून ठेवली !
Mumbai
Mumbai esakal

मुंबई : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भावना दुखविल्यामुळे सीएसएमटी-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस १५ ते २० मिनिट खोळबा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेची मध्य रेल्वेने गँभिर दखल घेत चौकशी निर्देश देण्यात आले आहेत.

Mumbai
Baby Care Tips : हिवाळ्यात बाळाची मालिश करण्यासाठी 'या' तेलांचा करा वापर, बाळ राहील तंदूरूस्त

मिळालेल्या माहितीनुसार,बुधवारी राजधानी एक्सप्रेस आपल्या निर्धारित वेळेनुसार सायंकाळी ४ वाजता सीएसएमटी स्थानकांतून रवाना झाली. या गाडीत भुसावळ विभागाचे वरिष्ठ मंडळ परिचलन व्यवस्थापक डॉ. राम निवास मीना हे अधिकृत पास किंवा तिकीट न घेता प्रथम श्रेणीच्या वातानुकूलित कुपेतून प्रवास करत होते. तेव्हा संबंधित आसनावरील प्रवासी आल्याने त्यांना डॉ. राम निवास मीना बसून दिसले. त्यानंतर प्रवाशांनी यांसदर्भात राजधानी एक्सप्रेसमध्ये कर्तव्यावर असलेल्या तिकीट निरिक्षकाकडे तक्रार केली. तेव्हा तिकीट निरीक्षकांनी राम निवास मीना यांना दुसर्‍या आसनावर जाण्यास सांगितले. त्यामुळे डॉ. राम निवास मीना यांच्या भावना दुखावल्याने त्यांनी तिकीट निरीक्षकांसोबत वाद घातला.

Mumbai
Career Tips : वारंवार सर्च करूनही जॉब मिळत नाही? मग,'या' स्ट्रॅटेजीचा करा वापर

वाद वाढला ट्रेनही थांबली

तिकीट निरीक्षक आणि भुसावळ विभागाचे वरिष्ठ मंडळ परिचलन व्यवस्थापक डॉ. राम निवास मीना यांच्या वाद चांगलाच वाढला. त्यानंतर राजधानी एक्सप्रेस भुसावळ स्थानकांवर येताच. टिकीट निरिक्षकाने मद्य प्राशन केले असल्याचा आरोप करत आपल्या अधिकाराचा गैरवापर करत ब्रेथ अ‍ॅनलायझर टेस्ट करण्याचे निर्देश रेल्वे सुरक्षा दलाला देण्यात आले. तसेच ते गाडी पुढे जाऊ देत नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. सुमारे १५-२० मिनिटे गाडीचा खोळंबा झाल्यानंतर अखेर गाडी मार्गस्थ झाली.

काय आहे नियम

रेल्वे कर्मचारी आणि अधिकारी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सोयीच्या कारणांसाठी, कर्तव्यासाठी आणि इतर विशेष प्रसंगी ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी मोफत किंवा सवलतीची सुविधा उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे. एखादी रेल्वे अधिकाऱ्याला रेल्वेने प्रवास करायचा असेल त्यांनी स्वत:कडे असलेले ओळखपत्र दाखवून विनामुल्य तिकीट घेऊन प्रवास करणे बंधनकारक आहे. त्यानुसार त्यांना सीटही मिळते. मात्र तिकीट न काढता प्रवास केलास तो प्रवास बेकायदेशीर ठरत असतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com